नमस्ते मित्रानो आज तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे या लेखमध्ये महाराष्ट्रातील अणुउर्जा प्रकल्प ,भारतातील प्रकल्प यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात बोईसर जवळ आहे पालघर तालुक्यात माहीमच्या उत्तरेस २५ किमी. व पश्चिम रेल्वेच्या बोयसर स्थानकाच्या पश्चिमेस ६ किमी. आहे. तारापूर येथील अणूऊर्जा प्रकल्प आहे.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पचा इतिहास भारत, अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजन्सी (आयएईए) यांच्यात 123 करारानुसार 1 उकळत्या पाण्याच्या रिएक्टर (बीडब्ल्यूआर) युनिट्सने केली. जीई आणि बेचटेल यांनी आण्विक ऊर्जा विभागासाठी हे बांधले. २८ ऑक्टोबर १९६९ रोजी २१० मेगावॅट वीज सुरू झाल्यापासून युनिट 1 आणि 2 व्यावसायिक ऑपरेशनसाठी ऑनलाइन आणले गेले. तांत्रिक अडचणींमुळे नंतर हे 160 मेगावॉटपर्यंत कमी झाले.
भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प
तारापूर या प्रकल्पची स्थापना १ एप्रिल १९६९ रोजी सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तसेच आशिया खंडातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. पालघर जिल्हा मुंबईच्या उत्तरेला 100 किमी वर आहे तारापूर प्रकल्पास सहकार्य अमेरिकेकडून मिळाले अणुऊर्जा क्षमता 420 मेगावॅट.
महाराष्ट्रातील अणुऊर्जा प्रकल्प
महाराष्ट्रातील अणुउर्जा संशोधन केंद्राबद्दल ३ जानेवारी १९५६ अणुउर्जा संशोधन केंद्राची स्थापना तुर्भे येथे हे मुंबई शहरात आहे नामकरण १९६७ ला भाभा अनु संशोधन केंद्र (BARC)असे केले संशोधनासाठी ५ अणु भटिया सुरु केल्या त्या १)अप्सरा २)सायरस ३)झार्लीना ४)पूर्णिमा ५) ध्रुव
अप्सरा अणु भट्टी
अप्सरा अअणु भट्टीची सुरुवात ४ ऑगस्ट १९५६ ला झाली सहकार्य भारत आणि ब्रिटन देशाचे विशेष म्हणजे आशिया खंडातील पहिली अणुभट्टी अप्सरा हे नाव पंडित नेहरू यांनी ठेवले ,१० सप्टेंबर २०१० पासून पूर्ण भारतीय झाली
सायरस अणु भट्टी
सायरस अणु भट्टीची सुरुवात १० जुलै १९६० झाली कॅनडा देशाच्या सहकार्याने स्थापित क्षमता ४० मेगावॉट होती विशेस म्हणजे पहिली अणुस्फोट चाचणी पोखरण -I याच अणुभट्टीत केली आहे सांकेतिक नाव बुद्ध हसला हि चाचणी १८ मे १९७४ ला जाली
झिरेलिना अणु भट्टी
झिरेलिना अणु भटीयाची स्थापना १४ जानेवारी १९६१ झाली क्षमता १०० मेगावॉट विशेष म्हणजे संपूर्ण भारतीय बनावटीची अणुभट्टी
पुर्णिमा अणु भट्टी
१)सुरुवात =१८ मे १९७२ पूर्णिमा -I
२)नूतनीकरण =१० मे १९८४ पूर्णिमा -II
३)९ नोव्हेंबर १९९० पूर्णिमा -III
ध्रुव अणु भट्टी
सुरुवात =८ ऑगस्ट १९८५
क्षमता =१०० मेगावॉट
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प
जैतापूर अणु भट्टी प्रकल्प हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात माडबन जैतापूर येथे नियोजित प्रकल्प आहे तब्बल ९,९०० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून, विदेशी (फ्रान्सच्या ) सहकार्यातून साकारला जात असलेला भारतातील पहिला प्रकल्प आहे
६ डिसेंबर २०१० ला या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील २ युरोपियन प्रेशराइज्ड अणुभट्यांची बांधणी केली आहे व २५ वर्षापर्यंत अणूइंधन पुरवण्यासाठी करार करण्यात आला. फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सार्कोझी व भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या करारावर स्वाक्षरी झाली आहे
फ्रान्सची अणुउर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी अरेवा व भारताची अणुउर्जा कंपनी न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या मध्ये हा ९३० कोटी डॉलरचा करार झाला आहे .
उमरेड
उमरेड अणु भट्टी नियोजित आहे नागपूर जिल्ह्यात
भारतातील अणुऊर्जा प्रकल्प
- गुजरात=काक्रापारा
- महाराष्ट्र=तारापूर, जैतापूर, उमरेड
- राजस्थान=रावतभाटा
- तमिळनाडू=कल्पकम, कुंडकुलम
- कर्नाटक=कैगा
- उत्तरप्रदेश=नरोरा
अणुऊर्जा केंद्र | ||||
अणुऊर्जा केंद्राचे नाव | स्थान | स्थापना | क्षमता | ऑपरेटर |
तारापूर अणुऊर्जा केंद्र – 1969 महाराष्ट्र NPCIL 1,400 |
||||
मद्रास अणुऊर्जा केंद्र (कल्पक्कम) | तामिळनाडू | 1984 | 440 | NPCIL |
काक्रापार | गुजरात | 1993 | 440 | NPCIL |
नरोरा अणुऊर्जा केंद्र | उत्तर प्रदेश | 1991 | 440 | NPCIL |
कैगा न्यूक्लियर पॉवर प्लांट | कर्नाटक | 2000 | 880 | NPCIL |
कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प | तामिळनाडू | 2013 | 2,000 | NPCIL |
अणुशक्ती मंडळ
भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना 10 ऑगस्ट 1948.
भारतीय अणुविज्ञानाचे जनक डॉ. होमी जहाँगीर भाभा. त्यांच्याच नावाने भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरची स्थापना 1957 झाली. १९५४ला स्वतंत्र अणुउर्जा विभाग स्थापना ,भारतात अणुउर्जा कार्याची सुरवात १९४० साली जाली
भारतात tata institute of fondamental research या बद्दल स्थापना १९४५ ला झाली संस्थापक जे.आर.डी.टाटा पहिले संचालक होमी भाभा तेव्हापासून अनु उर्जा संशोधनाची सुरुवात
Nuclear Power म्हणजे मराठीत अणु ऊर्जा होय ,अणुउर्जा हा अतिशय शक्तिशाली आणि पर्यावरणाला कमी हानिकारक आहे उदा.१०० टन दगडी कोळसा ज्वलनातून जेवढी उर्जा मिळते तेवढी उर्जा २८ गम युरेनियमपासून मिळते
अणुउर्जा कसा मिळवता युरेनियम, थोरिअम, प्लॅटिनम,रेडियम ,लीथीयम ,ड्यूटेरियम ,ट्रीटयम या सारख्या किर्नोस्तरीय खानिजातील अनुचे विघटन करून अणुशक्ती मिळवता येते महत्वाचा खनिज युरेनियम हा खनिज महत्वाचा आहे