कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2022 pdf हि योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली असून या योजनेचे नाव महात्मा जोतीबा फुले कर्ज मुक्ती योजना असे आहे.
शेतकर्यांना भांडवल उपलब्द करुन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे
हि योजना डिसेम्बर २०१९ ला सुरु केली गेली असून या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकरीच घेऊ शकतात.या योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत कर्ज माफी ची मुभा देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची गरज नाही.या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या आधार कार्डाची पडताळणी केली जाते. त्यानंतर, रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाते
कोणत्या शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घेता येणार नाही
या योजनेंतर्गत माजी मंत्री, माजी आमदार व खाजदार, केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना(चतुर्थ श्रेणी वगळता) लाभ दिले जाणार नाहीत.
राज्य सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी दूध संघ, नागरीक सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्यांचे संचालक मंडळ आणि ज्यांचे मासिक वेतन रु. 25000 पेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
शेती उत्पन्न व्यतिरिक्त आयाकर भरणाऱ्या शेतकर्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.